संत
तुकारामांनी सहज लिहिता लिहिता
किती छान लिहून ठेवलेय बघा....
घासावा
शब्द |
तासावा
शब्द |
तोलावा
शब्द |
बोलण्या
पूर्वी ||
शब्द
हेचि कातर |
शब्द
सुईदोरा
बेतावेत
शब्द |
शास्त्राधारे
||
बोलावे
मोजके |
नेमके
,खमंग
,खमके
|
ठेवावे
भान |
देश
,काळ
,पात्राचे
बोलावे
बरे |
बोलावे
खरे |
कोणाच्याही
मनावर |
पाडू
नये चरे ||
कोणाचेही
वर्म |
व्यंग
आणि बिंग |
जातपात
धर्म |
काढूच
नये ||
थोडक्यात
समजणे |
थोडक्यात
समजावणे |
मुद्देसुद
बोलणे |
हि
संवाद कला
शब्दांमध्ये
झळकावी |
ज्ञान
,
कर्म
,भक्ती
|
स्वानुभवातून
जन्मावा |
प्रत्येक
शब्द ||
शब्दां
मुळे दंगल |
शब्दां
मुळे मंगल |
शब्दांचे
हे जंगल |
जागृत
राहावं ||
जीभेवरी
ताबा |
सर्वासुखदाता
|
पाणी
,वाणी
,नाणी
|
नासू
नये
----------------------------------------------------------------------------
याविषयी सांगताना संत तुकाराम म्हणतात ः "एखाद्याला
वैराग्य प्राप्त होतं, तेव्हा एक गोष्ट घडते, ती म्हणजे, संसार
म्हटलं की वैरागी घाबरतो. विषय म्हटला, की घाबरतो, पण
विठूनामाचं तसं नाही...ते घेताना कोणतेही प्रयत्न करावे लागत
नाहीत. तंत्र-मंत्र शिकावं लागत नाही. एवढंच काय, आंघोळ
करणं किंवा तोंड धुण्याचीही गरज नाही.‘ आपण वर वर
स्वच्छ होऊन शुचिर्भूत होण्याचा प्रयत्न करत असतो; पण
संत तुकाराम सांगतात ः "जिवांनी (माणसांनी) द्रव्याची इच्छा
धरली तरी चालंल, संसाराला घाबरलं नाही तरी चालंल. कारण,
एका विठूरायाचं नाव भवदुःख नाश करणारं आहे. वेदशास्त्र
समजून घेण्याची खटपटही नाही केली, तरी चालंल. कारण,
सर्व काही विठ्ठलनामात भरून पावलं आहे.‘ किती सुंदर अभंग
आहे,नव्हे गुरुदास्य संसारिया। वैराग्य तरी भेणें कांपे विषयां।
तैसे नाम पंढरिया। जया सायास न लगती ।। 1।।
म्हणोनि गोड सर्वभावें। अंघोळी न लगे तोंड धुवावे।
अर्थचाड जीवें । न लागे भ्यावें संसारा ।। ध्रु.।।
कर्मा तंव न पुरे संसारिक। धर्म तंव फलदायक।
नाम विठ्ठलाचे एक । नाशी दुःख भवाचे ।। 2।।
न लगे सांडणे मांडणे। आगमनिगमाचे देखणे ।
अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामी आटलें ।।
जय हरी