Pages

बोधकथा


बोधकथा १०

क्रोध

            एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. 
             जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. 
            तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.पहिली पाळी सात्यकीची होती.सात्यकी पहारा करू लागला
             तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले. 
              पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.
           एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.
            पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. 
               सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,  "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’

तात्पर्य : - क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते.

बोधकथा ९

आत्मपरीक्षण

एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण (अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)
तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
महिला : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
तरुण : बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!
महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
तरुण : हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."
दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो"
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.
**********
तात्पर्य :
अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकर असा की मालक. ते महत्वाचे नाही तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर आपण स्वतः .


जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो👌🏻👌🏻

बोधकथा ८

एकदा राजाने प्रधानाला अचानक ३ प्रश्न विचारले 
१)'ईश्वर कुठे राहतो?
२)ईश्वर कसा मिळेल?    आणि
३) तो काय करतो?''
प्रधान हे अचानक प्रश्न ऐकून गड़बडून गेला व म्हणाला  ''महाराज! या प्रश्नांची उत्तरे उद्या देतो" 
प्रधान घरी पोचला तेव्हा खुप उदास होता. ती उदासी बघुन जेव्हा मुलाने विचारले तेव्हा प्रधान म्हणाला ''बेटा आज महाराजानी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत
१)'ईश्वर कुठे राहतो?
२)ईश्वर कसा मिळतो।   आणि
३) तो काय करतो?''
याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या याची उत्तरे द्यायची आहेत.
प्रधानाच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून जा व महाराजांना मी याची उत्तरे देईन
पुत्रहट्ट बघुन प्रधान दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला 
प्रधानाला पाहून महाराजानी म्हटले - काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे
प्रधान म्हणाला "महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल"
महाराजानी मुलाला पहीला प्रश्न विचारला  ''सांग, ईश्वर कुठे राहतो?"
मुलाने विनंती केली महाराज एक पेला दूध साखर घालून आणावे. आणल्यावर विचारले महाराज दूध कसे आहे? 
महाराजांनी दूध चाखले व म्हणाले गोड आहे.
परन्तु महाराज यात साखर दिसते का ?
महाराज म्हणाले साखर नाही कारण ती दुधात विरघळून गेली आहे.
बरोब्बर, महारज! 
ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे असून दिसत नाही.
महाराज आनंदीत होवून म्हणाले मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला 
''महाराज थोडे दही मागवाल का?
''महाराजानी दही मागवले. मग प्रधान पुत्र म्हणाला  ''महाराज! यात लोणी दिसते का?"
महाराज म्हणाले "लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल"
प्रधानपुत्र म्हणाला "महाराज तसेच देव दर्शन साठी मंथन साधना तपश्चर्या करायलाच लागेल"
महाराज खुश झाले व म्हणाले "आता अंतिम प्रश्न, ईश्वर करतो काय?"
प्रधानपुत्र म्हणाला - ''महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल'' 
महाराज बोलले - ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य''
पुत्र म्हणाला - ''महाराज गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो"
महाराजांनी सिंहासन ख़ाली केले व स्वतः खाली बसले.
प्रधानपुत्र स्वतः सिंहसनावर् बसला व म्हणाला "हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे"
महाराज म्हणाले "म्हणजे काय? मी समजलो नाही"
बालक म्हणाला- ''महाराज ! ईश्वर हेच तर करतो किंवा करण्याची क्षमता राखतो, क्षणात राजाला रंक आणि भिकाऱ्याला  राजा बनवू शकतो"

बोधकथा ७

एका सद्गृहस्थाच्या घरात एक दगड होता . तो अनेक कामी यायचा. म्हणून त्याने तो ठेवला होता.
दरवाजा अपोआप पुढे जाऊ लागला कि त्याला दरवाजाला लावायचा, मुलांना काही खेळायचे असल्यास तोच दगड, घरात कुत्र आल सौभाग्यवतींनी फेकून मारला, अशा असंख्य कामाला यायचा म्हणून तो दगड खितपत घरात पडला होता.
वापरून वापरून त्याची झीज झाली होती आणी गोल घुमट झाला होता.
एक दिवस त्या सद्गृहस्थांच्या घरी एक पाहुणे आले . सहज नजर पडली त्या दगडावर. पडली तर त्याची झीज होऊन होऊन एका बाजूने थोडा चमकत होता . सराफ कुळातील असल्याने त्यांनी परीक्षण केले आणी म्हणाले काय हो हे इतका मौलिक रत्न तुम्ही घराच्या दाराला अडसर म्हणून उभ केलंत ?
न समजून त्या सद्गृहस्थाने त्यांना प्रश्न उलट प्रश्न केला. ते रत्नपारखी म्हणाले , अहो खरंच हा साधा सुधा दगड नसून अलौकिक रत्न आहे . ते आज त्याची किंमत १० कोट च्या घरात तरी असेल ...
झाले !!! दगडाचे जीवनच बदलले . खसकन त्या गृहस्थाने तो दगड पाहुण्यांच्या हातून खेचला आणी तिजोरीत ठेवला.
मग कालपर्यंत नीच कामासाठी वापरत येणारा हा दगड आत्ता अलौकिक रत्न बनून तिजोरीत राहत होता !
दृष्टांत संपला आत्ता सिद्धांत .....
नरदेह हा सुद्धा त्याच दगडा सारखा आहे. तुम्ही आम्ही त्याला उगीच खितपत ठेवला आहे . नको त्या कमाल लावला आहे.
मग एक दिवस सद्गुरुंसारीखा रत्नपारखी भेटला आणी मग त्याने या नरदेहाची किंमत दाखवली आणी नंतरच त्याला तिजोरी प्राप्त झाली.
म्हणून म्हणतो, परमार्थाला आपण तोवर लागत नाही ; जोवर या जन्माची किंमत कळत नाही ...आणी जोवर ती कळत नाही तोवर परमार्थाचा अधिकारी नाही होऊ शकत.
ती जाणून घ्या आपण कशाला मनुष्य जन्माला आलोय आणी काय करतोय ,याच चिंतन करा ...

शेवटी काय; रत्न बनून तिजोरीत राहायचं कि खितपत जन्मोंजन्मी दरवाजाला पडत राहायचं , इतरांच्या हातातलं खेळण बनायचं हे ज्याच त्याने ठरावावं.

बोधकथा ६🙏🏻

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात. आणि त्यांत सहसा पोकळी असते. तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्याततिचा एक पाय चिणला गेला आहे.

त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं कीत्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली?

जे जवळ जवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याला दीसले की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.

कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता ! एक पाली सारखा
नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन नजाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.
तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं,विश्वास) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.....
नाती जपण्यात मजा आहे

बंध आयुष्यचे विणण

बोधकथा ५ 🙏🏻
एका सद्गृहस्थाच्या घरात एक दगड होता . तो अनेक कामी यायचा. म्हणून त्याने तो ठेवला होता.
     दरवाजा अपोआप पुढे जाऊ लागला कि त्याला दरवाजाला लावायचा, मुलांना काही खेळायचे असल्यास तोच दगड, घरात कुत्र आल सौभाग्यवतींनी फेकून मारला, अशा असंख्य कामाला यायचा म्हणून तो दगड खितपत घरात पडला होता.
      वापरून वापरून त्याची झीज झाली होती आणी गोल घुमट झाला होता.
       एक दिवस त्या सद्गृहस्थांच्या घरी एक पाहुणे आले . सहज नजर पडली त्या दगडावर. पडली तर त्याची झीज होऊन होऊन एका बाजूने थोडा चमकत होता . सराफ कुळातील असल्याने त्यांनी परीक्षण केले आणी म्हणाले काय हो हे इतका मौलिक रत्न तुम्ही घराच्या दाराला अडसर म्हणून उभ केलंत ?
       न समजून त्या सद्गृहस्थाने त्यांना प्रश्न उलट प्रश्न केला. ते  रत्नपारखी म्हणाले , अहो खरंच हा साधा सुधा दगड नसून अलौकिक रत्न आहे . ते आज त्याची किंमत १० कोट च्या घरात तरी असेल ...
      झाले !!!  दगडाचे जीवनच बदलले . खसकन त्या गृहस्थाने तो दगड पाहुण्यांच्या हातून खेचला आणी तिजोरीत ठेवला.
      मग कालपर्यंत नीच कामासाठी वापरत येणारा हा दगड आत्ता अलौकिक रत्न बनून तिजोरीत राहत होता !

दृष्टांत संपला आत्ता सिद्धांत .....

        नरदेह हा सुद्धा त्याच दगडा सारखा आहे.  तुम्ही आम्ही त्याला उगीच खितपत ठेवला आहे . नको त्या कमाल लावला आहे.
       मग एक दिवस सद्गुरुंसारीखा रत्नपारखी भेटला आणी मग त्याने या नरदेहाची किंमत दाखवली आणी नंतरच त्याला तिजोरी प्राप्त झाली.

      म्हणून म्हणतो,  परमार्थाला आपण तोवर लागत नाही ; जोवर या जन्माची किंमत कळत नाही ...आणी जोवर ती कळत नाही तोवर परमार्थाचा अधिकारी नाही होऊ शकत.
       ती जाणून घ्या आपण कशाला मनुष्य जन्माला आलोय आणी काय करतोय ,याच चिंतन करा ...

     शेवटी काय;  रत्न बनून तिजोरीत राहायचं कि खितपत जन्मोंजन्मी दरवाजाला पडत राहायचं , इतरांच्या हातातलं खेळण बनायचं हे ज्याच त्याने ठरावावं...

🙏🏻
बोधकथा ४

एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.

पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.

एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.

सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....
वाघ जोरात झेप घेतो...
आणि तितक्यात वीज चमकते...
त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो.

आणि

या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते.

माणसाचं आयुष्य हे असंच असतं..

त्याच्या हातात काहीच नसतं.

आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची..

कर्ता करविता असतो तो ईश्वर.

एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही.

मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच..

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं..

'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'

आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं..

कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच.

समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'.

त्याला    त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'
तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो..

ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?
कोण सांगेल? कोण सांगेल कोण??
कुणीच नाही.
हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं..कर्माच्या चक्रात अडकलेलं...
ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं.

मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही.
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते.
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका
कोणाचा  अपमान करू नका आणि*कोणाला कमीही लेखू नका
तुम्ही खूप शक्तिशाली असाल
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे
कोणी कितीही महान झाला असेल
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं....

बोधकथा ३

एका इमारतीचे बांधकाम चालू होते 
अकराव्या मजल्यावर इंजीनियर होता 
खाली कामगार काम करत होता
इंजिनियरला त्या कामगाराला कायतरी सांगायचे होते 
परंतु त्याचा आवाज कामगारापर्यंत पोहोचत नव्हता 
आता काय करायचे त्या कामगाराला सुचना कशा करायच्या याचा विचार करत होता 
इंजीनियर आपल्या खिशात हात घालतो 
इंजीनियर एक रुपयांचा नाणे खाली फेकतो 
त्याला वाटते ते एक रूपयाच नाण पाहून कामगार वर पाहील पण तसे काही होत नाही 
कामगार ते पडलेलेे एक रूपयाच नाण खिशात घालतो व आपले काम सुरू ठेवतो 
इंजीनियर परत इकडे तिकडे पाहतो परत पाच रूपयाच नाण खाली टाकतो 
आतातरी कामगार वर पाहील असं त्या इंजीनियरला वाटते 
पण तसं काही होता नाही 
पण तो कामगार वर काही पाहत नाही
परत कामगार ते पाच रूपयाच नाण खिशात घालतो आणि आपले काम सुरू ठेवतो 
आता इंजीनियर कामगाराच्या दिशेने वरून खडा टाकतो 
आता कामगार खडा़ कोणी टाकला म्हणून वर बघतो 
असेच काही माणसाच झाले आहे
देव माणसाला नोकरी देतो ज्यावेळी त्याला पैसा देतो त्यावेळी त्याचे लक्ष देवाकडे जात नाही 
देव माणसाला प्रमोशन देतो अधिक पैसा देतो तरीही माणसाचे लक्ष देवाकडे जात नाही 
मग देव माणसाच्या जीवनात एक संकटाचा खडा टाकतो 
मग माणसाचे लक्ष देवाकडे जातं 
मग माणूस देवाकडे हात जोडतो 


तर मित्रांनो योग्य वेळीच आपण जर देवाकडे हात जोडले तर देव आपले लक्ष वेढण्यासाठी आपल्या आयुष्यात खडा टाकणार नाही

बोधकथा २

एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले.
मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार त्याने केला. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेले. एका उंटाला दोरीने बांधले. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडली. आता काय करावे? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी हैराण झाला.
इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध." "महाराज, पण दोरी नाहीये न"
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर" त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला.
सकाळी व्यापारी उठून, सगळे यावरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा हैराण. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, "अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस?"
"पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न." पुजारी म्हणाला, "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा.
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!
पुजारी म्हणाला "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत. "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या ) गावी जाणार कसे?
तात्पर्य : आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पाहूया. नक्की आनंदी होऊ !! १
एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले.
मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार त्याने केला. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेले. एका उंटाला दोरीने बांधले. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडली. आता काय करावे? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी हैराण झाला.
इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध." "महाराज, पण दोरी नाहीये न"
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर" त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला.
सकाळी व्यापारी उठून, सगळे यावरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा हैराण. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, "अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस?"
"पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न." पुजारी म्हणाला, "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा.
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!
पुजारी म्हणाला "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत. "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या ) गावी जाणार कसे?
तात्पर्य : आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पाहूया. नक्की आनंदी होऊ !!

बोधकथा १

माणुसकीचा झरा

एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्याीच वेडावाकड्या अक्षरांमध्ये लिहिली होती. त्या चिठठीतील मजकूर असा होता.

‘माझी 50 रुपयांची नोट हरवली आहे. मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’

त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ’ अशी खुण पण सांगीतली होती.

त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले, चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्याावर स्वाभीमान असे तिचे रूप होते.

‘आजी मला तुमची 50 रुपयांची नोट सापडली! हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.

‘कमाल आहे! माझी हरवलेली 50 रुपयांची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत 40 माणसे येऊन गेली. तु 41 वा आहेस!’ आजी म्हणाल्या.

‘तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.

‘मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’ त्या माणसाने उत्तर दिले.

‘एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत! दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा!’ आजी म्हणाल्या.

‘नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ! तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.

‘कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या

‘माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.

‘हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’ त्या माणसाने उत्तर दिले.

‘अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक’ असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले.

परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.

त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले 50 रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्याच माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तेथुन निघुन गेला.

‘माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही’ अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त’ झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दीसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते.

तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्याेमध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामूळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या!

अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे