Pages

नारळ एकादशी व सोमवारी का फोड़त नाही


नारळ एकादशी व सोमवारी का फोड़त नाही 

नारळ हे एक फळ आहे. पण नारळाला ब्रह्मा विष्णु महेश व
आदिशक्ति जगदम्बा म्हणून ओळखले जाते. म्हणजे कोणत्याही कार्यात नारलाशिवाय पूजा परिपूर्ण होत नाही.
नारळ हे फल नसून त्यात तीनही देव वास करतात असे मानले जाते. जर एकादशी किंवा सोमवारी नारळ फोडले तर ब्रह्महत्या किंवा देवहत्या केल्याचे पाप लागते.एकादशी म्हणजे श्रीविष्णुंचा दिवस त्या दिवशी सर्व देवता श्री विष्णुंचा उपवास करतात. त्यामुळे नारळ फोडले तर श्रीविष्णुना मारहाण केले असे पाप लागते. सोमवारी नारळ फोड़त नाही कारण सोमवार हां दिवस महादेवांचा दिवस असतो. नारलात जे पाणी आहे ती गंगा आहे असे म्हंटले जाते. मग नारळ फोडले की त्या गंगेचा आपमान होतो. म्हणजे सांगायचा मुद्धा इतकाच् आहे की नारळ फोड़ने हे सोमवार किंवा एकादशिला ब्रह्महत्या असते. म्हणून नारळ फोड़त नाही. स्त्रियांनी सोमवार व गुरूवार कधीही नारळ फोड़ू नये. कारण नारलात देवी महालक्ष्मीचा वास असतो. स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते म्हणून स्त्रियांनी सोमवार व गुरूवार नारळ फोड़ू नये. खरे म्हटले तर नारळ हे देवाला दिलेले मनुष्याचे आत्मदान असते. म्हणजे नारळ देवाजवल ठेवणे म्हणजे ईश्वर आपले रक्षण करतो व त्याला करायला लावणे ही धारणा असते. नारळ हे ब्रह्मांडाचे रूप म्हणून ओळखले जाते.म्हणून नारलाची पूजा करतात पण नारळ हे देवाचे तत्व असल्यामुळे ते सोमवार व एकादशिला फोड़त नाही.
 ॐ नम शिवाय