अनुग्रह
अनुग्रह घेणे हा प्रकार सर्वांनी ऐकला असेलच. हा गुरूने आपल्या होणाऱ्या शिष्याला द्यायचा असतो. जेणेकरून तो शिष्य त्या गुरुच्या संप्रदायात सामील होतो.
परमार्थात ह्या अनुग्रह देणे आणि घेणे ह्यावर बरेच साहित्य उपलब्ध आहे. ह्याबाबत बऱ्याच चुका आणि गैरसमजुती आढळतात. मी वाचलेली आणि दिग्गजांकडून ऐकलेली त्यांची, ह्यावरची मते आज इथे मांडतो.
मुळात अनुग्रह म्हणजे शक्तीसंक्रमण. गुरु काही प्रमाणात आपली शक्ती किंवा ज्ञान ही शिष्यात परावर्तीत करतो त्या process ला अनुग्रह म्हणता येईल. हा अनुग्रह कोणी द्यायचा ह्याला खूप नियम आहेत. कोणालाही उठसुठ अनुग्रह देता येत नाही आणि कोणालाही तो उठसुठ घेता येत नाही.
सहसा एकांतात बसून आराध्याचे नमन करून, डोक्यावर हात ठेवून गुरु आणि शिष्य ध्यान लावतात आणि शक्ती संक्रमण केले जाते हा बहुतकरून अनुग्रह देण्याचा किंवा दीक्षा देण्याचा प्रचलित प्रकार आहे. पण अजूनही कमीत कमीत १० ते १५ प्रकार आहेत अनुग्रह देण्याचे. आपल्या समर्थांचे चरित्र पाहिल्यास त्याची प्रचीती येते. उदाहरणार्थ, कोणाच्या कानशिलात मारणे, कोणाच्या डोक्यावर आपल्या पादुका ठेवणे. कोणाच्या गळ्याला आपल्या पायाची तर्जनी लावणे. कोणाला जमिनीवर पाय आपटून “इकडे बघ” असे दरडावणे. हे सगळे त्याचेच वेगवेगळे प्रकार आहेत.
गुरु हयात नसेल किंवा प्रत्यक्ष उपस्थित नसेल तरीही अनुग्रह घेता येतो अर्थात त्यात शिष्याच्या गुरुप्रेमाची कसोटी लागते. त्या पातळीचे गुरुप्रेम असल्यास अप्रत्यक्षपणे ही अनुग्रह घेता येतो. महाभारतातील द्रोणाचार्य आणि एकलव्य हे ह्याबाबातीतील सर्वोत्तम उदाहरण आहे. किंवा आपल्या स्वामीनी त्यांचे सगुण रूप संपवल्यावर जी हिरे आणि माणके जन्माला आली, त्यांचे शिष्य किंवा अनुग्रहित म्हणून, ते ह्याचे उदाहरण ठरतील. अनेकांची नावे घेता येतील .
असो सर्वप्रथम आपण गुरूची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न करू .
आजकाल जो उठतो तो दीक्षा किंवा अनुग्रह द्यायला तयार असतो. कोणाला दृष्टांत झालेला असतो तर कोणाशी स्वामी स्वतः संवाद साधत असतात तर कोणाला स्वामिनी स्वतःदर्शन दिलेले असते. असे अनेक जण सद्या दिसतात किंवा भेटतात. ह्या सर्वांना माझे साष्टांग दंडवत. आणि मनापासून
पण गुरूने अनुग्रह देण्यासाठी स्वतःला सर्वप्रथम तेवढे सक्षम बनवावे लागते. ज्ञान एकवटावे लागते. ह्यानंतर त्याला समोरचा आपला अनुग्रह घेण्याच्या पात्रतेचा आहे का नाही ते तपासावे लागते आणि त्याचे ज्ञान असणे अत्यंत जरूरीचे.
बरेचदा अनुग्रह घेणारा हा परिस्थितीने ग्रासलेला असतो आणि तात्पुरता उपाय म्हणून अनुग्रहाकडे पाहात असतो. कोणाची इच्छा किती खोल आहे आणि प्रबळ आहे हे समजून घेणे हे सोप्पे काम नसते. ह्यासाठी त्याच पातळीचे ज्ञान असणे अनिवार्य असते. अनुग्रहाचा अनादर हा गुरु परंपरेचा अनादर असतो. माहिती नसल्यास सांगतो, आपल्या परमार्थात अनेकोनेक संप्रदाय आहेत, उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय. पण ह्या सर्वात अत्यंत जुना आणि पहिला संप्रदाय हा गुरु संप्रदाय किंवा दत्त संप्रदाय आहे अशी मान्यता आहे.
अनुग्रह का आणि कोणाला द्यावा हा पूर्णपणे गुरुचा निर्णय असू शकतो.
आजकाल अनुग्रह देवून भक्ताचा गैरफायदा घेतल्याची उदाहरणे समोर येतात ती ह्यामुळेच. कारण ह्या प्रकारात ना गुरु सक्षम असतो ना शिष्य. दोघेही आपापल्या मतलबाच्या धगीत पोळत असतात आणि वेळ मिळताच तो मतलब आपले कर्तब दाखवतो.
अनुग्रह घेण्यामागे शिष्याचा उद्देश आणि इप्सित ह्या दोन्ही गोष्टी अनुग्रह देण्यात महत्वाच्या भूमिका बजावतात. व्यावहारिक कारणामुळे किंवा आनुवंशिकतेमुळे बऱ्याचदा अनुग्रह मागितला जातो. त्याला काही अर्थ नाही. मग तेरड्याचा रंग तीन दिवस अशी गत लवकरच होते. हा सखोल अपमान आहे गुरु परंपरेचा. असे झाल्यास शिष्याला दुषणे लागतातच पण संपूर्ण जबाबदारी गुरुकडे जाते. म्हणूनच अनुग्रह कोणाला आणि का द्यावा हे अत्यंत महत्वाचे.
अनुग्रहाला सोवळे ओवळे नसते. दिवस रात्र, पंचांग, स्थळ, काळ आणि वेळ ह्याचे बंधन नसते. पण गुरुपोर्णिमा, दत्त जयंती किंवा कोणत्या अश्या दिवशी अनुग्रह देणे उचित मानतात कारण त्यादिवशी गुरु आणि शिष्य दोघांची मनःस्थिती ही पवित्र असते अशी किमान अपेक्षा असते.
अनुग्रह देणाऱ्या गुरुवर त्याच्या ज्ञानाची पातळी आणि पात्रता सोडली तर फारशी बंधने नाहीत. तो संसारी असू शकतो, सन्यासी असू शकतो. कुणीही असू शकतो. फक्त ज्ञान असणे आणि पात्रता असणे महत्वाचे. एकदा का अनुग्रह दिला की गुरूची जबाबदारी वाढते. समोरच्या शिष्याला मार्गदर्शन, वेळोवेळी मनोबल देणे किंवा योग्य दिशा दाखवणे , वेळप्रसंगी कानउघडणी करणे इत्यादी प्रकार आपसूक येतात. ह्यासाठी गुरु म्हणून स्वतः सक्षम असणे अनिवार्य ठरते.
नाहीतर “पावतीपुस्तक परमार्थ” करणारे गुरु खंडीभर मिळतात आणि त्याना पुजणारे शिष्यसुद्धा.
पुढच्यावेळी अनुग्रहित शिष्य आणी त्याचे कर्तव्य ह्या बद्दलचे विचार मांडेन जे माझ्यासारख्याला नेहमीच मार्ग दाखवतात.
अनुग्रह घेणे हा प्रकार सर्वांनी ऐकला असेलच. हा गुरूने आपल्या होणाऱ्या शिष्याला द्यायचा असतो. जेणेकरून तो शिष्य त्या गुरुच्या संप्रदायात सामील होतो.
परमार्थात ह्या अनुग्रह देणे आणि घेणे ह्यावर बरेच साहित्य उपलब्ध आहे. ह्याबाबत बऱ्याच चुका आणि गैरसमजुती आढळतात. मी वाचलेली आणि दिग्गजांकडून ऐकलेली त्यांची, ह्यावरची मते आज इथे मांडतो.
मुळात अनुग्रह म्हणजे शक्तीसंक्रमण. गुरु काही प्रमाणात आपली शक्ती किंवा ज्ञान ही शिष्यात परावर्तीत करतो त्या process ला अनुग्रह म्हणता येईल. हा अनुग्रह कोणी द्यायचा ह्याला खूप नियम आहेत. कोणालाही उठसुठ अनुग्रह देता येत नाही आणि कोणालाही तो उठसुठ घेता येत नाही.
सहसा एकांतात बसून आराध्याचे नमन करून, डोक्यावर हात ठेवून गुरु आणि शिष्य ध्यान लावतात आणि शक्ती संक्रमण केले जाते हा बहुतकरून अनुग्रह देण्याचा किंवा दीक्षा देण्याचा प्रचलित प्रकार आहे. पण अजूनही कमीत कमीत १० ते १५ प्रकार आहेत अनुग्रह देण्याचे. आपल्या समर्थांचे चरित्र पाहिल्यास त्याची प्रचीती येते. उदाहरणार्थ, कोणाच्या कानशिलात मारणे, कोणाच्या डोक्यावर आपल्या पादुका ठेवणे. कोणाच्या गळ्याला आपल्या पायाची तर्जनी लावणे. कोणाला जमिनीवर पाय आपटून “इकडे बघ” असे दरडावणे. हे सगळे त्याचेच वेगवेगळे प्रकार आहेत.
गुरु हयात नसेल किंवा प्रत्यक्ष उपस्थित नसेल तरीही अनुग्रह घेता येतो अर्थात त्यात शिष्याच्या गुरुप्रेमाची कसोटी लागते. त्या पातळीचे गुरुप्रेम असल्यास अप्रत्यक्षपणे ही अनुग्रह घेता येतो. महाभारतातील द्रोणाचार्य आणि एकलव्य हे ह्याबाबातीतील सर्वोत्तम उदाहरण आहे. किंवा आपल्या स्वामीनी त्यांचे सगुण रूप संपवल्यावर जी हिरे आणि माणके जन्माला आली, त्यांचे शिष्य किंवा अनुग्रहित म्हणून, ते ह्याचे उदाहरण ठरतील. अनेकांची नावे घेता येतील .
असो सर्वप्रथम आपण गुरूची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न करू .
आजकाल जो उठतो तो दीक्षा किंवा अनुग्रह द्यायला तयार असतो. कोणाला दृष्टांत झालेला असतो तर कोणाशी स्वामी स्वतः संवाद साधत असतात तर कोणाला स्वामिनी स्वतःदर्शन दिलेले असते. असे अनेक जण सद्या दिसतात किंवा भेटतात. ह्या सर्वांना माझे साष्टांग दंडवत. आणि मनापासून
पण गुरूने अनुग्रह देण्यासाठी स्वतःला सर्वप्रथम तेवढे सक्षम बनवावे लागते. ज्ञान एकवटावे लागते. ह्यानंतर त्याला समोरचा आपला अनुग्रह घेण्याच्या पात्रतेचा आहे का नाही ते तपासावे लागते आणि त्याचे ज्ञान असणे अत्यंत जरूरीचे.
बरेचदा अनुग्रह घेणारा हा परिस्थितीने ग्रासलेला असतो आणि तात्पुरता उपाय म्हणून अनुग्रहाकडे पाहात असतो. कोणाची इच्छा किती खोल आहे आणि प्रबळ आहे हे समजून घेणे हे सोप्पे काम नसते. ह्यासाठी त्याच पातळीचे ज्ञान असणे अनिवार्य असते. अनुग्रहाचा अनादर हा गुरु परंपरेचा अनादर असतो. माहिती नसल्यास सांगतो, आपल्या परमार्थात अनेकोनेक संप्रदाय आहेत, उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय. पण ह्या सर्वात अत्यंत जुना आणि पहिला संप्रदाय हा गुरु संप्रदाय किंवा दत्त संप्रदाय आहे अशी मान्यता आहे.
अनुग्रह का आणि कोणाला द्यावा हा पूर्णपणे गुरुचा निर्णय असू शकतो.
आजकाल अनुग्रह देवून भक्ताचा गैरफायदा घेतल्याची उदाहरणे समोर येतात ती ह्यामुळेच. कारण ह्या प्रकारात ना गुरु सक्षम असतो ना शिष्य. दोघेही आपापल्या मतलबाच्या धगीत पोळत असतात आणि वेळ मिळताच तो मतलब आपले कर्तब दाखवतो.
अनुग्रह घेण्यामागे शिष्याचा उद्देश आणि इप्सित ह्या दोन्ही गोष्टी अनुग्रह देण्यात महत्वाच्या भूमिका बजावतात. व्यावहारिक कारणामुळे किंवा आनुवंशिकतेमुळे बऱ्याचदा अनुग्रह मागितला जातो. त्याला काही अर्थ नाही. मग तेरड्याचा रंग तीन दिवस अशी गत लवकरच होते. हा सखोल अपमान आहे गुरु परंपरेचा. असे झाल्यास शिष्याला दुषणे लागतातच पण संपूर्ण जबाबदारी गुरुकडे जाते. म्हणूनच अनुग्रह कोणाला आणि का द्यावा हे अत्यंत महत्वाचे.
अनुग्रहाला सोवळे ओवळे नसते. दिवस रात्र, पंचांग, स्थळ, काळ आणि वेळ ह्याचे बंधन नसते. पण गुरुपोर्णिमा, दत्त जयंती किंवा कोणत्या अश्या दिवशी अनुग्रह देणे उचित मानतात कारण त्यादिवशी गुरु आणि शिष्य दोघांची मनःस्थिती ही पवित्र असते अशी किमान अपेक्षा असते.
अनुग्रह देणाऱ्या गुरुवर त्याच्या ज्ञानाची पातळी आणि पात्रता सोडली तर फारशी बंधने नाहीत. तो संसारी असू शकतो, सन्यासी असू शकतो. कुणीही असू शकतो. फक्त ज्ञान असणे आणि पात्रता असणे महत्वाचे. एकदा का अनुग्रह दिला की गुरूची जबाबदारी वाढते. समोरच्या शिष्याला मार्गदर्शन, वेळोवेळी मनोबल देणे किंवा योग्य दिशा दाखवणे , वेळप्रसंगी कानउघडणी करणे इत्यादी प्रकार आपसूक येतात. ह्यासाठी गुरु म्हणून स्वतः सक्षम असणे अनिवार्य ठरते.
नाहीतर “पावतीपुस्तक परमार्थ” करणारे गुरु खंडीभर मिळतात आणि त्याना पुजणारे शिष्यसुद्धा.
पुढच्यावेळी अनुग्रहित शिष्य आणी त्याचे कर्तव्य ह्या बद्दलचे विचार मांडेन जे माझ्यासारख्याला नेहमीच मार्ग दाखवतात.