Pages

धर्म


धर्म 



धर्म हा माणसाच्या जगण्याच्या संस्कृतीतुन तयार झाला. पण मुद्दा हा आहे कि कशामुळ डार्विन खरा अन रामायण महाभारत 

वगैरे खोटे ??  Gajanan Maharaj

मुळात माणसाची उत्पत्ती हाच मोठा आगम्य विषय आहे.. तुमचा डार्विन सहित बरेच पाश्चात्य शास्त्रज्ञ म्हणतात की सजीव 

पाण्यापासून निर्माण झाले व त्यातुन आदिमानव तयार झाला व नंतर तो विकसित होत आत्ताच्या मानव म्हणून ओळखतात.

जर हे मान्य केल तर मग मला सांग आजपर्यंत लाखो वर्षात समुद्र नदी इ. तुन का एखादा मानव सदृश प्राणी तयार नाही 

झाला ?

जर वित्ज्ञानच खर अन हिंदू धर्म वेद पुराण खोटे तर का विज्ञानाला समुद्रातुन गोड पाणी 

नाही तयार करता आल का आजपर्यंत रक्त तयार करता आल ?

अरे एखाद्या पुरूषाच वीर्य स्त्रीयोनित गेल्यावरच मानव जीव तयार होतो . तो आजपर्यंत 

पाण्यातुन नाही तयार होत हे  सत्य आहे एवढच काय तर कोणताच सजीव वीर्याशिवाय 

आजपर्यंत तयार झाला नाही व तयारही होणार नाही मग मला सांग  अशी कोणती शक्ती आहे 

की जिने पहिला पुरूष आणि पहिली स्त्री तयार केली अशी कोणती शक्ती आहे की जिने 

पहिला नर-मादी किटक किडे पक्षी फळझाडे  प्राणी जलचर भूचर इ. जीव जे मित्रा ती 

शक्ती आहे आमचा देव ती अदृश्य शक्ती आहे !! पण नक्कीच अस्तित्वात आहे.

अरे आमचे वेद जे अनाकलनीय आहेत. जे संपूर्ण जगातील धर्मग्रंथात अतिप्राचीन सिद्ध झालेले आहेत ते सांगतात-

कि प्रजापती नामक देवाने या ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या पृथ्वीवर गंधर्व आणि 16 मातृका तयार केल्या व त्यापासून 

मानव तयार झाले मग का आम्ही डार्विन मान्य करावाआणि तो डार्विन व बाकीचे पाश्चात्य तर्क याच सिद्धांतावर लंगडे 

पडत असतील तर मग कशावरून त्यांनी  सांगितलेली धातुयुग व इतर गोष्टी खर्या मानाव्यात ???

अजून एक

आर्यभट्टाने सांखिकिय म्हणजे आकड्यातील शुन्याचा शोध लावला.

त्याच्याआधी आपले मोजमाप हे शब्दात असायचे उदा. एकक दशम शतम सहस्रम औक्षहोणी (लक्ष) करोड खर्व इ...

त्यामुळंच तुमचा महान शास्त्रज्ञ एडिसन सुद्धा देवाच अस्तित्व मान्य करून म्हणतो 

वीज हि निर्मिती आहे पण तिचा 

निर्माता मी नाही.. मी फक्त शोधक आहे...