----------------------------------------------------
परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्तीला "प्रभाव आणि पैसा नाही"
तर "स्वभाव आणि संबंध" कामाला येतात
दररोज सकाळी ऊठल्यानंतर प्रार्थना करा की
हे देवा रात्र तर सुखाने गेली पण
आता दिवस उगवला आहे
माझ्या या वाणीने, माझ्या ह्रदयाने,
माझ्या डोळ्याने आणि माझ्या हाताने
कुणाचेही वाईट असे घडु नये
---------------------------------------------------
रोज सकाळी परमेश्वर
या पृथ्वीवर सुख -दुःखाची
नाणी फेकत असतो.
ज्याच्या हाती सुखाची
नाणी पडतात,
तो सुखाचा व्यापार करतो,
पण दुःखाची नाणी
हाती पडूनही
जो सुखाचा व्यापार करतो,
त्यालाच जीवन जगणे म्हणतात.
---------------------------------------------------
एखाद्याला गरजेपेक्षा जास्त जीव
लावला कि तुमचे महत्त्व कमी होते
आणि तुम्ही ज्याची काळजी करता
त्याला असे वाटते कि,
ह्याला आपल्या शिवाय कुणी
नाही
इथे दोष तुमचा नाही
त्या व्यक्तिच्या बुद्धिचा आहे
---------------------------------------------------
कृतज्ञता ही सुसंस्कृतपणाची सर्वोच्च पायरी आहे
---------------------------------------------------
खरं बोलून मन दुखावल तरी चालेल...
पण खोट बोलून आनंद देण्याचा
प्रयत्न करू नका...
आयुष्यातील काही गोष्टी
कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात...
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच
लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात
---------------------------------------------------
प्रवाहाच्या बरोबर वाहनारे
निर्जीव असतात.
त्या प्रवाहात
स्वत:ची दिशा ठरविणारे
सजीव असतात...
----------------------------------------------------
मी कधी कधी बोलत नाही
याचा अर्थ मी चुकलोय असा नाही,
मी तुमच्यासाठी शांत आहे,
कारण तुम्हाला गमवायची
माझ्यात हिम्मत नाही
----------------------------------------------------
इच्छा
इच्छा किती विचित्र
गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर
क्रोध वाढतो.
आणि
पूर्ण झाली तर
लोभ वाढतो
-----------------------------------------------------
रोज सकाळी मी कोनते कपडे
घालु हा विचार करण्यापेक्षा
मी आज कोणते काम चांगले करु
हा विचार केला तर नक्कीच
समाज बदलेल
-----------------------------------------------------
भावनांचं मोल जाणून
मोठेपणात न हरवता
जो आयुष्यात पुढे जात असतो
त्याचच प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं
-----------------------------------------------------
पैशासह देव शोधायला जाल तर
स्वतःच स्वतःमध्ये मिटाल,
त्याच पैशाचा वापर जनकल्याणासाठी
कराल तर याच दुनियेत देवमाणूस
म्हणून जगाल.
-----------------------------------------------------
बघायला गेलं तर....
आयुष्यही खूप सोपे असत.
जगायला गेलं तर...
दु:खातही सुख असत.
-----------------------------------------------------
पाप वाईट असते यात
शंकाच नाही....
पण पुण्य केल्याचा गर्व
त्याही पेक्षा वाईट असतो
------------------------------------------------------
भावनांचं मोल जाणून
मोठेपणात न हरवता
जो आयुष्यात पुढे जात असतो
त्याचच प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं
------------------------------------------------------
मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे.
माणसाने ती करायला शिकल पाहिजे
जिथं जिथं तडा जाईल,
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलंच नुकसान होत नाही.
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते.